शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दरात हुतात्मा, राजारामबापूच लय भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:54 IST

सांगली : साखर कारखानदार आणि संघटनांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार उसाला एफआरपी अधिक २०० रुपये दर निश्चित झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार जिल्ह्यातील कारखान्यांकडून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता टनाला २३०० ते ३१०० रुपये हातात पडतील. राजारामबापू, हुतात्मा कारखान्यांचा दर उच्चांकी राहणार आहे. महांकाली, वसंतदादा, माणगंगा, सदगुरू श्री श्री शुगर कारखान्यांची एफआरपीच ...

सांगली : साखर कारखानदार आणि संघटनांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार उसाला एफआरपी अधिक २०० रुपये दर निश्चित झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार जिल्ह्यातील कारखान्यांकडून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता टनाला २३०० ते ३१०० रुपये हातात पडतील. राजारामबापू, हुतात्मा कारखान्यांचा दर उच्चांकी राहणार आहे. महांकाली, वसंतदादा, माणगंगा, सदगुरू श्री श्री शुगर कारखान्यांची एफआरपीच कमी असल्यामुळे ते फॉर्म्युल्यापेक्षाही जादा दर देण्याच्या प्रयत्नात आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आणि साखर कारखानदारांची कोल्हापूर येथे रविवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक २०० रुपये प्रतिटन देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला. तोच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीही मान्य केला आहे. काही साखर कारखानदारांची एफआरपी कमी आहे. यामुळे या कारखानदारांनी उसाची उपलब्धता होण्याच्यादृष्टीने जादा दर देण्याची घोषणा केली आहे. सांगलीतील वसंतदादा (दत्त इंडिया) कारखान्याच्या व्यवस्थापनाने तोडणी आणि वाहतुकीसह तीन हजार रुपयापेक्षा जादा दर देण्याची तयारी दर्शविली आहे. आटपाडी तालुक्यातील माणगंगा, सदगुरू श्री श्री शुगर, खानापूर तालुक्यातील यशवंत, जत तालुक्यातील डफळे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली या कारखान्यांची एफआरपी कमी आहे. यापैकी यशवंत, डफळे कारखान्यांचे गळीत चालू होण्याची शक्यता कमीच आहे. उर्वरित तीन कारखाना व्यवस्थापनानेही एफआरपी अधिक २०० यापेक्षाही जादा दर देऊन ऊस उचलण्याची तयारी दर्शविली आहे.राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव आणि सर्वोदय या तीनही युनिटची एफआरपी साडेबारा टक्क्याहून जास्त आहे. यामुळे या कारखान्यांचा तोडणी आणि वाहतुकीसह दर प्रतिटन ३४३९ पर्यंत आहे. हुतात्मा कारखान्याचा २०१६-१७ गळीत हंगामातील साखर उतारा १२.९९ टक्के होता. यामुळे या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना टनाला ३४८५.३२ रुपये दर मिळणार आहे. यात तोडणी आणि वाहतुकीच्या खर्चाचा समावेश आहेच. जिल्ह्यातील पाच कारखाने वगळल्यास सर्वच कारखान्यांचा दर तीन हजार रुपयांपुढे जाणार आहे.दराची कोंडी फुटल्यामुळे कारखान्यांच्या गळीत हंगामालाही आता गती मिळणार असल्याचे दिसत आहे. शेतकरी संघटनांच्या लढ्यामुळेच ऊस उत्पादकांच्या पदरी चांगला दर मिळाल्याची भावना शेतकरी वर्गामध्ये आहे. सोमवारपासून ऊसवाहतूकही सुरू झाल्याचे दिसत होते.दि. २२ आॅक्टोबर २००९ रोजीच्या साखर नियंत्रण आदेशामध्ये सुधारणा केली आहे. त्यामध्ये ऊस उत्पादकांची जोखीम आणि लाभ विचारात घेऊन, माफक नफा मिळण्याची तरतूद केलेली आहे. त्यानुसार १ आॅक्टोबर २००९ पासून साखरेच्या हंगामांचा रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) निश्चित करण्याचा अधिकार केंद्र शासनास आहे. त्यानुसार केंद्र शासनाने २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी जाणाºया उसाला ९.५० टक्के साखर उताºयासाठी २५५० रुपये आणि त्यापुढील प्रत्येक टक्क्याला २६८ रुपये एफआरपी निश्चित केली आहे.असा असेल दर (तोडणी, वाहतूक)कारखाना उतारा दर (रुपये)वसंतदादा (दत्त इंडिया) ९ २५५०राजारामबापू (साखराळे) १२.८२ ३४३९.७६विश्वास १२.०५ ३२३३.०४हुतात्मा १२.९९ ३४८५.३२माणगंगा ९.८४ २६४१.१२महांकाली १०.६४ २८५५.५२राजारामबापू (वाटेगाव) १२.६३ ३३८८.८४डफळे ९ २५५०सोनहिरा १२.५९ ३३७८.१२क्रांती ११.९३ ३२०१.२४सर्वोदय १२.७५ ३४२१मोहनराव शिंदे ११.१८ ३०००.२४निनाईदेवी (दालमिया) ११.६४ ३१२३.५२यशवंत (नागेवाडी) ९ २५५०केन अ‍ॅग्रो (डोंगराई) ११.४६ ३०७५.२८उदगिरी शुगर ११.७० ३१३९.०६सदगुरु श्री श्री शुगर ९.८८ २६५१.८४तोडणी, वाहतूक खर्च ५०० ते ७०० रुपयेक्रांती साखर कारखान्याचा ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च प्रतिटन ५०० रुपये, तर राजारामबापू, हुतात्मा, सर्वोदय, मोहनराव शिंदे या कारखान्यांचाही खर्च जवळपास तेवढाच आहे. वसंतदादा, माणगंगा, महांकाली या कारखान्यांचा तोडणी व वाहतूक खर्च ७०० ते ९०० पर्यंत दाखविला आहे. संघटना आणि कारखानदारांमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यातून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा होऊन ऊस उत्पादक शेतकºयांच्या हाती २४०० ते ३१०० रुपयांपर्यंत अंतिम दर मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती